राजेळी जातीची केळी पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकवून, सुकवून, फळातला मुळातला गोड टिकवून सुकेळी तयार करण्याची प्रक्रिया तशी किचकट आणि कौशल्याची. वसई परिसरात दिवाळीनंतरच्या चार- पाच महिन्यात मिळणाऱ्या या सुकेळ्यांचे पुरेसे मार्केटिंग झाले, तर हे फळ फळांच्या राजाच्या तोडीस तोड ठरू शकेल.
↧