नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर राहणा-यांना सगळ्यात जास्त उणीव भासते ती म्हणजे घरच्या जेवणाची. ही उणीव भरुन काढण्यासाठी सुरू झाल्या त्या 'खानावळी'. हॉटेलच्या तुलनेमध्ये थोडं साध्या पध्दतीचं पण रुचकर जेवण पुरविणाऱ्या या खानावळींनी आज अनेकांच्या मनात घरच्या जेवणाची जागा पटकावली आहे. नाशिकमध्ये वर्षानुवर्षे चालणा-या अशा अनेक खानावळी आज हॉटेल्सच्या स्पर्धेतही लोकप्रिय ठरल्या आहेत.
↧